त्या ५ मिनिटांत फार मोठी चूक

जगाला हादरून सोडणाऱ्या कोरोनाच्या वाढत्या दहशती खाली संपूर्ण देश आहे या रोगाच्या साथीचा सामना करण्यासाठी  सरकाने देशभरात जनताकर्फ्यू पाळला गेला. आपत्कालीन सेवा देणाऱ्यांची व पोलिस, डॉक्टर, वैद्यकीय सेवेचे आभार मानण्यासाठी दुपारी पाच वाजता पाच मिनिटं थाळीनाद, टाळ्या वाजवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं होतं. पण याच पाच मिनिटात अनेकांनी एक मोठी घोडचूक केली आहे.


देशात एक मोठे संकट उभे आहे या संकटाचा सामना करायचा आहे. ज्या कोरोना रोगाच्या साथीने जवळपास संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. त्याला हरविण्यासाठी आता अनेक प्रयत्न केले जात आहे. 



भारतात देखील सध्या कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहेत. अशावेळी काही कठोर निर्णय सरकारने घेतले. त्यातील सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जनता कर्फ्यू. खुद्द पंतप्रधान मोदींनी सांगितल्याप्रमाणे देशभरात जनताकर्फ्यू पाळला गेेला. पण त्याचवेळी डॉक्टर, वैद्यकीय सेवेचे आभार मानण्यासाठी दुपारी पाच वाजता पाच मिनिटं थाळीनाद, टाळ्या वाजवण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं होतं. पण याच पाच मिनिटात अनेकांनी एक मोठी चूक केली.


आपण जिथे राहत तिथेच आपल्या खिडकीत, गॅलॅरी ,दरवाजा, टेरेसवर, बाल्कनीमध्ये येऊन २४ तास आपल्यासाठी परिश्रम घेणाऱ्यांचे टाळ्या वाजवून किंवा थाळीनाद करुन आभार मानावेत असं पंतप्रधानांनी केलं होतं.


 


संपूर्ण दिवसभर रस्ते, गल्ली,मोहल्ले, बाजारपेठा, दुकानेबंद होत्या सर्वत्र शुकशुकाट होता . जनताकर्फ्यू ला यश आले होते. त्यामुळे आज संपूर्ण देशभरात पाच वाजता अनेकांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला साथ देत थाळीनाद केला. पण याच वेळी बऱ्याच ठिकाणी एक मोठी चूक झालेली दिसून आली.


 


कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी एकत्र न येणं, गर्दी न करणं. हाच सध्या तरी जालीम उपाय आहे. मात्र, आज दिवसभर घरात बसणाऱ्या अनेकांनी त्या पाच मिनिटात आपल्या इमारतीच्या गच्चीवर किंवा खालील परिसरात एकत्र येऊन थाळीनाद करण्याचा एक सामूहिक कार्यक्रम जल्लोष करत आटोपलेला पहिला मिळाला. त्यामुळे एकत्र न येण्याचा, गर्दी न करण्याची चूक अनेकांनी पुन्हा केल्याचं दिसून आलं. अनेक इमारतींच्या गच्चीवर , छोट्या छोट्या वस्तीत मैदानात , चौकाचौकात , लोक घोळक्याने थाळीनाद करत असल्याचं दिसून आलं. जर यापैकी एखादी व्यक्ती देखील कोरोना पॉझिटिव्ह असेल तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती असतांनाही असे एकत्र येऊन उत्सवा सारखा थाळीनाद किंवा अन्य जल्लोष करणे धोक्याचे होते हे माहिती असूनही केले त्यामुळे दिवसभर पाळलेल्या जनताकर्फ्यू वर पाणी सोडले नाही ना हा प्रश्न पडतो आहे.