काही ठळक मुद्दे
◆ मीरा-भाईंदर शहरात कोरोना विषाणूची लागण ८जणांना
◆संख्या वाढवण्यासाठी हेच असतील कारणीभूत
◆नागरिकांच्या तक्रारी सुरूच,
महानगरपालिकेने लक्ष देण्याची गरज
◆रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याचा जजाणकारांकडून वर्तवला जातोय अंदाज
देशात महाराष्ट्र राज्याची कोरोना विषाणूची लागण झालेली संख्या दिवसंदिवस वाढतच आहे. या सवंसर्गजन्य साथीने जगाला हवालदिल केले आहे. या साथीचे रुग्ण मिरा-भाईंदर शहरात ६ जण मिळून आलेअसल्याची बातमी २ तारखेला पोलिस मदत पत्र ने दिली होती आता त्यात दोन रुग्णांची संख्या वाढली आहे. आता शहरात कोरोनाचे ८ रुग्ण झाले आहेत. त्यामुळे नागरिकां मधील चिंता वाढतच चालली आहे. या चिंतेत शहरात आणखी भर पडली आहे. शहरात आता कोरोनाच्या रुग्णाची संख्या वाढून ती ८ वर पोहचली आहे.
भाईंदर पूर्व येथील एस व्ही रोड विभागातील ५६ वर्षीय महिलेला आणि भाईंदर पश्चिम नारायण नगर मधील ६० वर्षीय महिलेला कोरोनाचे संक्रमण झाले आहे.
शहरातील नागरिकांनी दक्षता बाळगावी. कुटुंबाची काळजी घ्यावी.कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सध्यस्थीत मिरा-भाईंदरमध्ये ८ जणांना करोनाची लागण झाल्याची माहिती मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली आहे.
मिरा-भाईंदरमध्ये ४४१ नागरिकांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आहे. तसंच ४१९ नागरिकांना घरातच अलगीकरण करण्यात आले आहे. रोज या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे ६९ स्वॅब तपासण्यांमध्ये ८ रुग्ण हे पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.तर ३४ जणांचे निगेटिव्ह आले असून २७ जणांचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही.दरम्यान पोलिसांनी रुग्ण वास्तव्य करीत असलेल्या इमारतीकडे जाणारे रस्ते प्रतिबंधित केले असून पुढील आदेश येईपर्यंत कोणालाही घराबाहेर न पडण्याबाबत सांगण्यात आले आहे.
संख्या वाढवण्यासाठी हेच असतील कारणीभूत
शहरातील नागरिक या महामारीला गंभीरपणे घेतांना दिसत नाहीत. संचारबंदी सुरू असतानाही नागरिक काळजी घेताना दिसत नाहीत. विनाकारण गर्दी केली जाते अनावश्यक पणे फिरणाऱ्यांची संख्या कमी होतांना दिसत नाही. याचाच परिणाम शहरात जाणवत आहे. जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या, विक्रीच्या नावाखाली फिरणारे जास्त आहेत. त्याच बरोबर शहरातील नागरिकांनी अनावश्यक घरा बाहेर पडणे हे धोक्याचे आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. घराच्या बाहेर पडू नये अशी विनंती शासनाच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे.
नागरिकांच्या तक्रारी सुरूच,
महानगरपालिकेने लक्ष देण्याची गरज
तर नागरिकांकडुन अश्या तक्रारी समोर येत आहेत की , जीवनावश्यक वस्तू,किराणा दुकानातील सामान, भाजीपाला, दररोज घरात लागणाऱ्या वापरा च्या वस्तू हे चढ्या भावाने दुकानदार विकत आहेत त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. याची दखल मनपाने घेणे गरजेचे आहे. दुकानदारांवर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. तर बऱ्याच दुकानात माल मिळत नाही त्यामुळे हे भाव वाढवले जात आहेत. तर वेगवेगळ्या विभागात एकाच वस्तूची वेगवेगळी किंमत पाहायला मिळत आहे. त्यामूळे या लॉकडाउन च्या काळात पैसा येण्याचा मार्ग बंद झाला आहे. दुकानदार सर्वसामाण्यांची पिळवणूक करत आहेत. असे अनेक नागरिक सांगत आहेत यावर सरकारने लक्ष द्यावे. अशीही मागणी नागरिकांकडून वाढताना दिसत आहे.