चिटर कंपन्यांच्या संचालकांना गजाआड करण्याऐवजी केले कर्ज माफ, गरिबांचा पैसा घातला श्रीमंतांच्या घशात

चिटर कंपन्यांच्या संचालकांना गजाआड करण्याऐवजी केले कर्ज माफ, गरिबांचा पैसा घातला श्रीमंतांच्या घशात


गरीबाच्या खिशातला पैसा काढून श्रीमंताच्या घशात पैसा टाकणा-या मोदी सरकार नि आता कहरच केलेला दिसतोय सरकारचे कर्ज बुडणाऱ्या घोटाळेबाजांचे  68 हजार 607 कोटी कर्ज माफ करण्याचा डाव आरबीआयच्या माध्यमातून साधला आहे .अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पीएनबी घोटाळा तला फरार आरोपी मेहुल चोकशीला बेड्या ठोकण्या ऐवजी त्याचाही कंपनीचे कर्ज माफ करणारे हे सरकार, देशाला आर्थिक संकटाच्या खाईत लोटणारा हे सरकार, भांडवलदारांच्या इशाऱ्यावर चालतय हे नक्की झाला आहे.


माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले त्यांनीही माहिती मागवली होती त्यामध्ये 16 फेब्रुवारी पर्यंत कर्ज बुडव्यांच्या कर्जाची स्थिती काय  आहे अशी माहिती होती. याच बाबीसंदर्भात खात्याचे राज्यमंत्री अनुराग ठाकूर याना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रश्न विचारला होता जे सत्य केंद्र सरकार लपवत होतं त्याचा खुलासा झाला आहे .
आरबीआयच्या उत्तरात ६८ हजार ६०७ कोटी रक्कमेचा थकबाकी तसेच तांत्रिकदृष्ट्या / हेतूपूर्वक राइट ऑफ (बुडवलेली) रक्कमेचा समावेश आहे. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतची अशी कर्जे राइट ऑफ करण्यात आली आहेत.  देशातील सर्वोच्च बँकेने सुप्रीम कोर्टाच्या १६ डिसेंबर २०१५ च्या निकालाचा हवाला देत कर्ज घेऊन परदेशात गेलेल्या व्यक्तींची माहिती देण्यास नकार दिला आहे.
देशाला कर्जाच्या नावाने लुठणाऱ्याया ५० चिटर कंपन्यांना  गजाआड करण्या ऐवजी   त्यांचे कर्ज माफ केले जाते या पेक्षा दुर्दैव काय असू शकते या देशाचे गितांजली जेम्स लिमिटेड , चोक्सीच्या कंपनीने एकूण ५ हजार ४९२ कोटींचे कर्ज घेतलं होतं. तर गिली इंडिया लिमिटेड आणि नक्षत्र ब्रॅण्ड्स लिमिटेड या कंपन्यांनी अनुक्रमे १ हजार ४४७ आणि १ हजार १०९ कोटींचे कर्ज घेतले होते. मेहुल चोकसीने अँटिगाचे नागरिकत्त्व मिळवले आहे. तर चोकसीचा भाचा आणि पीएनबी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असणारा नीरव मोदी हा लंडनमध्ये बिनधास्त पणे राहत आहेत त्याना बेड्या ठोकण्याची सरकारची हिंमत होत नाही या मागे नक्कीच काही गुपित लपले आहे.


या मध्ये आरआयई अँग्रो लिमिटेड या कंपनीने ४ हजार ३१४ कोटींचे कर्ज घेतले होते. संचालक संदीप झुनझुनवाला आणि संजय झुनझुनवाला यांची मागील वर्षभरापासून ईडीच्या चौकशीच्या जाळ्यात अडकले आहेत. तर जितेन मेहता यांची विन्सम डायमंड्स अ‍ॅण्ड ज्वेलरी या  कंपनीने ४ हजार ७६ कोटींचे कर्ज घेतले होते. सीबीआयकडून वेगवेगळ्या बँकांची फसवणूक केल्याप्रकरणी या कंपनीची चौकशी सुरु आहे.


कोठारी ग्रुपने २ हजार ८५० कोटींचे कर्ज घेतले होते. त्याचबरोबर कुडोस केमी, पंजाब (२ हजार ३२६ कोटी), बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांच्या मालकीची रुची सोया इंडस्ट्रीज लिमिटेड, इंदूर (२ हजार २१२ कोटी) आणि झूम डेलव्हलपर्सं प्रायव्हेट लिमिटेड, ग्वालियर (२ हजार १२ कोटी) या कंपन्यांचाही या यादीत समावेश आहे. या यादीत १८ कंपन्यांची १ हजार कोटी कर्ज घेतल्याची माहिती आहे. त्यात हरिश मेहता यांची अहमदाबादमधील फॉरएव्हर प्रेशियस ज्वेलरी अ‍ॅण्ड डायमंड्स प्रायव्हेट लिमिटेड (१ हजार ९६२ कोटी) आणि फरार असणाऱ्या विजय माल्याची किंगफिशर एअरलाइन्स लिमिटेड (१ हजार ९४३ कोटी) या कंपन्यांचा समावेश आहे. तर एक हजार कोटींहून कमी कर्ज घेतलेल्या २५ कंपन्यांची यादी आहे.


हिरे ज्वेलरी उद्योगातले  ६ जण हे  कर्ज बुडवणार याचा  पैकी आहेत . या प्रकरणातून कोणताही उद्योग वाचला नाही. यामध्ये आयटी, बांधकाम, ऊर्जा, सोने-हिरे व्यापार, औषध क्षेत्रातील कंपन्यांची नावे मोठ्या प्रमाणात आहेत. या घोटाळेबाजांना पाठीशी घालणाऱ्या सरकारच्या कृत्यांने देशात अहंकार माजला आहे. देशातील नागरिकांना धार्मिक तेच षड्यंत्रात बळी पाडून बड्या धेंडांच्या डोक्यावरती हात ठेवणाऱ्या सरकारची की बेजबाबदारपणाची कामगिरी लोकांच्या लक्षात येत आहे