अडकलेल्यानां गावी पोहचता येईल, पण त्या साठी लागेल या अधिकाऱ्यांचे पत्र

अडकलेल्यानां गावी पोहचता येईल, पण त्या साठी लागेल या अधिकाऱ्यांचे पत्र


कोरोना महामारीचे वाढते संक्रमण वाढत चालले आहे तर लॉकडाऊनमुळे  ठिकठिकाणी अडकून पडलेल्यांची तारांबळ उडते आहे. त्यासर्वाना आता त्यांच्या गावी जाता येणार आहे. कामगार, मजूर, यात्रेकरू, विद्यार्थी, हे लॉकडाउन मुळे अडकून पडले होते त्यांना त्यांच्या राहत्या ठिकाणी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने धोरण निश्चित केले या प्रक्रियेवर जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील. तर मंत्रालयातील नियंत्रण कक्षाद्वारे यावर लक्ष दिले  जाईल.याबाबतीत अतिशय काळजीपूर्व आणि जबाबदारीने सर्व यंत्रणांनी अंमलबजावणी करावी, असे निर्देश महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी  दिले आहेत.


मंत्रालयात महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ नितीन करीर, महिला बाल विकास प्रधान सचिव आय.ए कुंदन, तसेच संचालक , आपत्ती व्यवस्थापन अभय यावलकर यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ०२२-२२०२७९९०, ०२२-२२०२३०३९ हे दूरध्वनी क्रमांकअसून controlroom@maharashtra.gov.in हा ईमेल देण्यात आला आहे.


 ज्या जिल्ह्यातील जे नागरिक लॉकडाउन मध्ये अडकले आहेत त्या अडकलेल्या व्यक्तींची यादी जिल्ह्यांचे नोडल अधिकारी करतील व जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करतील. वेगवेगळ्या राज्यातील लोकांच्या साठी दोन्ही राज्ये एकमेकांशी बोलून वाहतूकीची रूपरेखा ठरवतील.
जिल्हाधिकारी किंवा संचालक, राज्य आपत्ती व्यवस्थापन यांचे पत्र असल्याशिवाय कोणालाही या कोणत्याही समुदायाला जाता येणार नाही,  तशी परवानगी दिली जाणार नाही.  ज्याना गावी जायचे आहे त्या व्यक्तीना कोविड  १९ च्या आजरा सारखी लक्षणे नसतील त्यानांच केवळ स्थलांतर करण्याची परवानगी मिळणार आहे. लक्षणे दिसल्यास त्यांच्यावर सध्या आहेत त्याचभगत  उपचार केले जातिल.


जाण्यासाठी देण्यात आलेल्या परवानगी पत्रात जिल्ह्यांमधील प्रशासनाने त्या व्यक्तीला कुठलेही लक्षण नाही हे स्पष्टपणे लिहिलेले असणे आवश्यक आहे. ज्या राज्यात ती व्यक्ती जात आहे तेथील राज्याने ठरवलेल्या नियमांप्रमाणे वागणे व उपचार घेणे त्या व्यक्तीवर बंधनकारक राहणार आहे. जे खाजगी किंवा स्वत:च्या वाहनाने जाउ इच्छित  आहेत त्यांनादेखील राज्यांची संमती पत्रे घेणे आवश्यक आहे. प्रवाशाना घेऊन जाणाऱ्या वाहनांकडे राज्यासरकारने दिलेला ट्रान्झीट पास असणे व त्यावर सर्व प्रवाशांची नावे व इतर माहिती असणे गरजेचे आहे. यामध्ये वाहनाचा निश्चित मार्ग, कालावधी असणेही बंधनकारक आहे.पाठपुराव्यासाठी ज्या स्थळी जे प्रवासी उतरणार आहेत तशी यादी त्या ठिकाणच्या प्रशासनाकडे देण्यात येणार आहे. वाहतुकीला वापरण्यात येणारी वाहने जंतुनाशकांनी फवारलेली असावी. तसेच वाहनात देखील सोशल डिस्टेंसिंग पालन करावे लागणार आहे. 


बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात आलेल्या सर्व प्रवाशांची प्रथम वैद्यकीय तपासणी केली जाईल,त्यानंतर १४ दिवस  व्यक्तीला त्याचा घरीच क्वारंटाईन किंवा संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येईल तसेच त्यांना केंद्र शासनाचे आरोग्यसेतू मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगण्यात येईल जेणे करून त्यांना कायम संपर्कात ठेवता येईल अशी माहिती मिळते आहे.