दोन लाख वारकऱ्यांच्या सोबत प्रकाश आंबेडकर आज पंढरपूरात करणार आंदोलन
वारकरी संप्रदायाने मंदिर खुले करावे अशी मागणी केली आहे पण सरकारने मंदिर खुले केले नाही त्यामुळे मंदिर खुले व्हावे यासाठी वारकरी संप्रदाय आंदोलनाची भूमिका घेत आज रस्त्यावर उतरनार आणि मंदिर प्रवेश करणार आहे या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे पाठिंबा देत आंदोलन करणार आहेत त्यामुळे पंढरपूरला छावणी चे रूप आले आहे.
पंढरपूर येथील मंदिर वारकऱ्यांच्यासाठी आणि जनतेसाठी खुले करावे अशी मागणी वारकरी संप्रदायाने केली पण सरकारने या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले त्यामुळे सरकार विरोधात वारकऱ्यांचा आक्रोश निर्माण झाला आणि लॉकडाउन तोडत मंदिर प्रवेश आंदोलन पुकारण्यात आले आहे या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा देत या आंदोलनात सहभागी होणार अशी भूमिका घेत वंचित आघाडीचे नेते आणि बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर हे या आंदोलनात प्रत्यक्ष हजर राहणार असल्यामुळे पंढरपूरात पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे
प्रकाश आंबेडकर उद्या पंढरपुरात दोन लाख वारकऱ्यांचा उपस्थितीत दाखल होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
प्रकाश आंबेडकरांच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची भांबेरी उडालेली दिसत आहे, पंढरपूरात तगडा पोलीस बंदोबस्तलावण्यावरून हे स्पस्ट होत आहे की, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या मंदिर प्रवेशाच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पंढरपुरात प्रशासन हादरलं आहे.
पंढरपूरमध्ये प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. पंढरपूरात तगडा पोलीस बंदोबस्त तर आहेच या पार्श्वभूमीवर रविवारी एसटी वाहतूक बंद केली आहे.
केंद्र आणि राज्य सरकारने अनलॉक करत असताना अनेक गोष्टींना सूट दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी एसटी सुरू करण्यासाठी, कटिंग दाढी ची दुकाने सुरू करण्यासाठी ही कडक भूमिका घेतली होती म्हणून आज ते सुरळीत चालू झाले आहे मात्र, मंदिर प्रवेश याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने आता मंदिर प्रवेशाचा मुद्दा उचलला आहे. उद्या पंढरपुरात प्रकाश आंबेडकर दोन लाख वारकऱ्यांसह रस्त्यावरती उतरणार आणि मंदिर प्रवेशासाठी आंदोलन करण्यात येणार आहे असा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, राज्य सरकारनं 31 ऑगस्टपूर्वी पंढरपूरचे मंदिर खुले केले नाही तर त्या ठिकाणी वारकरी, महाराज यांच्यासह लाखो लोकांच्या मदतीने आंदोलन करण्यात येईल. त्यामुळे शासनाने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला होता.
वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर राज्यातील एसटी, बस सेवा चालू करण्यात आली. शासनाने पानटपऱ्या, सलून तसेच इतर व्यवसाय सुरू झाले. मात्र मंदिर अद्यापही बंद आहेत. शासनाने 31 ऑगस्ट पूर्वी पंढरपूरचे मंदिर खुलं झालं नाही तर लाखो वारकरी 31 ऑगस्ट रोजी मंदिरात प्रवेश करतील. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा,' असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
राज्यात सगळं काही सुरू मग मंदिरच बंद का महाराजांचा प्रश्न
राज्यात दारू, गुटख्याची दुकानं चालू असताना विठ्ठल मंदिर बंद का? असा सवाल विश्व वारकरी सेनेचे संस्थापक ह.भ.प.अरुण महाराज बुरघाटे व ह.भ.प. शेट्ये महाराज यांनी सरकारला केला आहे. सरकार प्रतिसाद देत नसल्यानं 31 ऑगस्टला मोठ्या संख्येने पंढरपूरला येण्याचं आवाहन वारकरी बांधवांना करण्यात आलं आहे. या आंदोलनात वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याची माहिती मिळते आहे तर सरकार काय भूमिका घेणार या कडे सर्वाचें लक्ष लागले आहे.