वंचितच्या ‘डफली बजाव’ आंदोलनाला महाराष्टात जोरदार प्रतिसाद

वंचितच्या ‘डफली बजाव’ आंदोलनाला महाराष्टात जोरदार प्रतिसाद



सरकारने कोरोनाच्या भीतीपोटी लादलेल्या लॉकडाउनमुळे हाल केले आहेत. हातावरचे पोट असलेले हात थांबले आहेत संसाराचा गाडा कसा पुढे न्यावा हा प्रश्न समोर उभा आहे. हाताला काम मिळावे म्हणून लॉकडाउन खुला करा, एसटी बस सेवा सुरू करा, गरिबांना काम ध्या, छोटे छोटे व्यवसाय पूर्वरत करा म्हणत वंचित बहुजन आघाडी ने सरकार विरोधात "डफली बजाव लॉकडाउन हटाव" म्हणत एल्गार पुकारला त्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलने केली गेली, तर राज्यात जोरदार प्रतिसाद पहायला मिळालाआहे.


 


केंद्र व राज्य सरकारकडे कोणतेही नियोजन नाही कोरोनाच्या आड जनतेला वेठीस धरले जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या राज्यातला आठरा अलुतेदार आणि बारा बलुतेदार वर्गाचे लॉकडाऊन च्या नावाखाली कंबरडे मोडले आहे. राज्यात लॉकडाउन शिथिल केला असला तरीही जिल्हा बंदी व राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनिक बससेवा सुरू झाल्या पाहिजे या प्रमुख मागण्या घेऊन वंचित बहुजन आघाडीने आज ‘डफली बजाव’ करत सरकार विरोधात एल्गार पुकारला. आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः केले.नागपूरमध्ये प्रकाश आंबेडकरांनी या आंदोलनात सहभाग घेत सरकारचा निषेध नोंदवला. तालुका आणि जिल्हा पातळीवर मोठया प्रमाणात कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते तरुणाईची संख्या जास्त प्रमाणात पाहयेला मिळाली. मुंबई उपनगरे व आजूबाजूच्या परिसरात पावसाचा जोर असतांनाही शेकडो कार्यकर्ते डफली घेऊन आंदोलन करतांना दिसून आली तर संपुर्ण राज्यात वंचितचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आंदोलन करताना दिसले. 


राज्यसरकारने मिशन बिगेन अगेन च्या नावाखाली काही व्यवहार सुरू झाले असले तरी, जिल्हाबंदी कायम ठेवत गाव खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडली गेलेली एसटी सेवा व नागरी भागात असलेली मानवी वाहतूक सेवा बंद ठेवली आहे जिल्हा बंदी हटवली गेली नाही त्यामुळे अनेकांच्या व्यावसायावर मोठे परिणाम झाले आहेत.


टाळेबंदीमुळे फेरीवाले, डेकोरेशन, नाभिक, चर्मकार यांचे व्यवसाय बंद पडले आहेत. टाळेबंदीचा फटका बसलेल्या या सर्वांना सरकारकडून मदत न मिळाल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीकडून आदोंलन पुकरण्यात आले आहे.


ठाणे जिल्ह्यात ही ठाणे , कल्याण, डोंबिवली, भिवंडी, बदलापूर, कसारा मिरा-भाईंदर सह अनेक ठिकाणी केले गेले कार्यकर्ते भर पावसात ही रस्त्यावर उतरलेले दिसले.


राज्यसरकार चे लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधण्यासाठी प्रयत्न केलेला दिसून आला. त्यामुळे या आंदोलनाची दखल घेत महाविकास आघाडी सरकार यावर काही तोडगा कढेल का? हे येणाऱ्या भविष्यकाळात दिसेल.